भारतीय अर्थव्यवस्थेची पुनर्प्राप्ती आणि मानांकन निकष
भारतीय अर्थव्यवस्थेची पुनर्प्राप्ती आणि मानांकन निकष
डॉ. राजू घनश्याम श्रीरामे
smitarajan76@gmail.com
mobile : 9049940221
बॉक्स
ज्यावेळी अर्थव्यवस्थेला रेटिंग एजन्सीने D असे ग्रेडिंग दिलेले असेल तर त्याचा अर्थ हा तो देश, अर्थव्यवस्था, कंपनी, किंवा व्यक्ती कधी उधार घेतलेले ऋण, रक्कम, किंवा उधार फेडण्यास अयशस्वी ठरलेला आहे. त्याची वर उठण्याची कोणतीही क्षमता तूर्तास नाही असाच याचा अर्थ होतो.
लेख
जागतिक महामारीच्या काळात कोरोनामुळे जगभरातील सर्वच अर्थव्यवस्थांप्रमाणे मोठ्या प्रमाणात बदल घडून आलेले आपल्या सर्वांनाच ठाऊक आहेत. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची आर्थिक परिस्थिती ही ढासळलेली आहे. दरम्यान देशात लॉकडाऊन उठवल्यानंतर आता या परिस्थितीत सकारात्मक बदल होत आहेत. यासंदर्भात भारताची अर्थव्यवस्था सुधारत आहे, असे सर्व अंदाज समोर येत असून ही एकंदरीत उत्साहवर्धक अशीच बाब राहिलेली आहे. जागतिक रेटिंग एजन्सी असलेल्या फिंच रेटिंग्जने भारताचे रेटिंग अधिक सुधारत असल्याचे आपल्या अहवालात नमूद केलेले आहे. यात काही बदल केलेले असले तरी त्यांना अजूनही काहीसे संभाव्य धोके दिसून येत असल्याचे दिसून आलेले आहे. यात काहीसा बदल करतानाच दीर्घकालीन नकारात्मक दृष्टिकोनासह ट्रिपल – B म्हणजेच नकारात्मक दृष्टीकोन कायम ठेवलेला आहे. फिचच्या माहितीनुसार, येणा-या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा घडून येणार असून या कालावधीत आर्थिक विकास दर हा 8.7% राहणार असल्याचे दिसून आलेले आहे. कोरोना काळामुळे जगभरातील सर्वच अर्थव्यवस्थांप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था ही सुध्दा याला अपवाद नसून भारतीय अर्थव्यवस्थेची परिस्थिती ही ढासळली आहे. दरम्यान देशव्यापी लॉकडाऊन उठवल्यानंतर या परिस्थितीत हळूहळू बदल होत असल्याचे चित्र दिसून आलेले आहे.
रेटिंगचा अर्थ
जेव्हा कोणतीही रेटिंग एजन्सी एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेला विशिष्ट रेटिंग देत असते तेव्हा त्याचा अर्थ हा निश्चित स्वरूपाचा असतो. जेव्हा कोणतीही रेटिंग एजन्सी ही एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेला AAA म्हणजेच ट्रिपल अ अ अ ही श्रेणी देत असते त्यावेळी तो देश , ती अर्थव्यवस्था, किंवा कंपनी ही गुंतवणूक करण्यासाठी सर्वाधिक सुरक्षित व लाभदायक आहे असाच त्याचा अर्थ होत असतो. ज्यावेळी A A अशा प्रकारची रेटिंग एखादी एजन्सी ही एखाद्या अर्थव्यवस्थेला देत असते तेव्हा त्याचा अर्थ हा तो देश, ती अर्थव्यवस्था किंवा व्यक्ती आपल्या ध्येयाला पूर्ण करण्यात , किंवा आपले ध्येय निश्चित करण्यात अगदी सक्षम असून तिची क्षमता ही भरपूर आहे असाच त्याचा अर्थ होतो. कधी एखादी रेटिंग एजन्सी एखाद्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात A अशी रेटिंग देते तेव्हा तो देश , ती अर्थव्यवस्था किंवा कंपनी त्यांच्याजवळ असलेल्या क्षमतेवर विपरीत परिणाम पडलेला असून त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर अत्यंत वाईट परिणाम होत आहे असाच त्याचा अर्थ निघताना दिसून येतो. यावेळी फिंच या एजन्सीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात BBB अशा प्रकारची रेटिंग दिलेली असून ही अर्थव्यवस्था किंवा कंपन्या आपले इप्सीत साध्य किंवा प्राप्त करण्यासाठी क्षमता असली तरी यात विपरीत आर्थिक परिस्थिती असल्यामुळे सध्याच्या आर्थिक परिस्थितीत अधिक प्रभावित होण्याची कमी शक्यता आहे असा याचा अर्थ होतो. जेव्हा एखाद्या एजन्सीने CC अशा प्रकारची एखाद्या अर्थव्यवस्थेला रेटिंग दिली असेल तर तो देश किंवा कंपनी किंवा संस्था वा व्यक्ती वर्तमान स्थितीत खूपच कमजोर असल्याचे दिसून येत आहे असा याचा अर्थ होतो. ज्यावेळी रेटिंग एजन्सीने D असे ग्रेडिंग दिलेले असेल तर त्याचा अर्थ हा तो देश, ती अर्थव्यवस्था, कंपनी, किंवा व्यक्ती कधीकाळी उधार घेतलेले ऋण, रक्कम, किंवा उधार फेडण्यास अयशस्वी ठरलेला आहे. त्या घटकाची वर उठण्याची कोणतीही क्षमता तूर्तास नाही असाच याचा अर्थ होतो. या परिस्थितीत मध्यम कालावधीत भारताचा विकासाचा दृष्टीकोन सध्या तरी अधिक मजबूत दिसत आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत झपाट्याने सुधारणा झाल्याचे फिचने आपल्या महत्वपूर्ण अहवालात म्हटलेले आहे. यामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेवरील आर्थिक ताण हलका झालेला आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये काय असणार जीडीपी वाढ?
या एजन्सीच्या मते, आर्थिक व्यवस्थेवरील दबाव कमी झाल्याने मध्यम मुदतीच्या ग्रोथ आउटलुक संबंधित जोखीम कमी होत असल्याचे दिसून आलेले आहे. फिचने 2021-22 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 8.7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. याच वेळी फिंच या रेटिंग एजन्सीने 2022- 2023 या आर्थिक वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेच्या जीडीपित होणारी आर्थिक वाढ ही 10 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. फिचच्या मते, भारताच्या रेटिंगची ही पातळी देशाच्या मध्यम कालावधीतील मजबूत वाढीची शक्यता दर्शवित असून भारतीय अर्थव्यवस्थेची पुनर्पदावरील, प्राप्ती लवकर होणार असून परकीय चलनाच्या साठ्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत बाह्य धक्के सहन करण्याची क्षमता असून , उच्च सार्वजनिक कर्ज आणि कमकुवत आर्थिक क्षेत्र यांच्या दृष्टीने ती अत्यंत संतुलित आहे. फिंच या एजन्सीने असे म्हटले आहे की, भारतिय अर्थव्यवस्थेचा या नकारात्मक दृष्टिकोनामुळे दीर्घ काळासाठी सरकारच्या कर्जाबाबत अनिश्चिततेची परिस्थिती असणार आहे हेच दाखवत आहे. यासंदर्भात फिचने असेही म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये भविष्यात वाढ होण्याची शक्यता अजूनही आहे. मात्र आता अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम पूर्वीपेक्षा खूपच कमी होईल. आताच्या परिस्थितीत फोर्टिस हेल्थकेअर (FHL) ने Q2 FY 2022 मध्ये ICICI सिक्युरिटीजच्या अंदाजापेक्षा जास्त प्रभावी कामगिरी केलेली आहे, ज्याला सर्वकालीन उच्च ARPOB द्वारे समर्थित आहे. या तिमाहीत आरोग्य क्षेत्र असलेल्या क्षेत्रात रुग्णालये आणि डायग्नोस्टिक्स या दोन्ही विभागांमध्ये चांगली रिकव्हरी दिसून आलेली आहे. हा ट्रेंड व्यवसायातील सुधारणेसह भविष्यात असाच चालू राहील अशी अपेक्षा आहे. ब्रोकरेज फर्मने फोर्टिस हेल्थकेअरमधील आपलं टार्गेट 282 रुपयांवरुन वाढवून 303 प्रति शेअर केलेले आहे. शेअर बाजारातील ही स्थिती अधिक सकारात्मक असून फोर्टिसची कमाई दुसऱ्या तिमाहीत वार्षिक 47% टक्क्यांनी वाढलेली आहे. यात रुग्णालये आणि SRL (डायग्नोस्टिक्स) यांनी वाढ नोंदवली आहे. कंपनीचे EBITDA मार्जिन 19.4 टक्क्यांवर स्थिर राहिलेला असून खर्च हळूहळू सामान्य होत आहेत. विविध कंपनीचे व्यवस्थापन खर्च नियंत्रित करण्यासाठी व्यवस्थापनाकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत. सध्या या कंपन्यांनी खर्च नियंत्रण करण्यासाठी विविध उपायांची अंमलबजावणी सुरू ठेवलेली आहे. शेअर बाजारातील ब्रोकरेजचा असा विश्वास आहे की, हळूहळू उत्पन्न वाढून EBITDA मार्जिन FY2021 – FY2023 E मध्ये 820 bps ने सुधारुन 18.2% टक्क्यांपर्यंत वाढू शकते. सर्वसामान्य परिस्थितीत हा असाच एकंदरीत अंदाज आहे . ICICI सिक्युरिटीजने या संदर्भातील आपली अधिक भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, SRL मधील रिकव्हरी आणि हॉस्पिटलमधील वाढ लक्षात घेऊन FY 2022 E – FY2023 E साठी उत्पनाच्या टर्न ओवरचा अंदाज 5 ते 6 टक्के आणि EBITDA अंदाज 5 - 6 टक्के टक्क्यांनी वाढवला जात आहे. रेटिंग एजन्सी फिंचला अशी अपेक्षा आहे की, यूएसमध्ये FY 2021 -FY2022 - 2023 E कमाई आणि EBITDA CAGR अनुक्रमे 29.5 टक्के आणि 74.2 टक्के राहतील असेच अंदाज आहेत. सध्या BSE शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, भारतातील टॉपचे गुंतवणूकदार आणि शेअर बाजारातील व्यापारी राकेश झुनझुनवाला यांच्या अहवालानुसार सप्टेंबर 2021 पर्यंत फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेडमध्ये 4.23 टक्के ऐवढा हिस्सा होता. दिवसेंदिवस हा हिस्सा वाढत असून सध्या देशातील वातावरण हे विदेशी गुंतवणुकीला अधिक अनुकूल आहे.
आर्थिक पुनर्प्राप्तीचे विविध आकार व त्यांचे अर्थ
भारतीय अर्थव्यवस्थेच्या एकूणच कार्यस्थितीचे पुनरावलोकन करावयाचे झाल्यास भारतीय अर्थव्यवस्थेची 10 वर्षांपूर्वीची आर्थिक परिस्थिती कदाचित वेगळी असेल पण तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी जून 2010 मध्ये यूएस-इंडिया सीईओ फोरममध्ये केलेले भाष्य सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेच्या संदर्भात अगदी लक्षात ठेवण्यासारखे आहे. यासंदर्भात ते म्हणाले होते की, “यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य करणारे अनेक अर्थशास्त्रज्ञ गेल्य काही वर्षात आपले मत मांडत होते की, जागतिक अर्थव्यवस्था ही व्ही-आकाराच्या दिशेने जात आहे. सध्या तिची याच दिशेने वाटचाल सुरु असून ती लवकरच पुनर्प्राप्ती करेल. अगदी तिचे मूल्यमापन करायचे झाल्यास अलीकडे नवीन संकटांच्या जोखमीसह अर्थतज्ञ म्हणतात की ही व्ही. डबल शेप किंवा डब्ल्यू-आकाराची असून त्या दिशेने तिची पुनर्प्राप्ती असू शकते. आता तर माझ्या संदर्भात सांगायचे झाल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे एक अभ्यासक म्हणून अध्ययन करताना खरे सांगायचे तर इंग्रजी शब्दकोशातील प्रत्येक अक्षरासाठी आर्थिक पुनर्प्राप्तीचा सिद्धांत अस्तित्वात आहे असा मला विश्वास वाटायला लागलेला आहे. आर्थिक पुनर्प्राप्तीच्या अनेक स्पर्धात्मक सिद्धांतांचा अर्थ असा आहे की आम्हाला खरोखरच याचे कोणतेही अचूक उत्तर माहित नाही.” भारतीय अर्थव्यवस्थेतील व्ही-आकाराची पुनर्प्राप्ती म्हणजे झटपट घट झाल्यानंतर तिच्यात तीव्र आणि तीक्ष्ण वाढ होत आहे असाच याचा अर्थ होताना दिसून येतो. भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुनर्प्राप्तीच्या U-आकाराचा अर्थ असा होतो की, अर्थव्यवस्थेत होणारी घट आणि तिचा पिक अप या दरम्यान काही महिने, अगदी काही वर्षे लागू शकतात असाच याचा अर्थसंकेत असल्याचा अर्थ बोध होतो. अर्थव्यवस्थेच्या पुनर्प्राप्तीच्या डब्ल्यू-आकाराची पुनर्प्राप्ती, ही अशी असते की, ज्यात ज्याला "डबल डिप" देखील म्हटले जाते. याचा अर्थ अर्थव्यवस्था फक्त पुन्हा घसरण्यासाठी उचलली जाते आणि नंतर पुन्हा वाढू लागते, तर एल-आकाराची पुनर्प्राप्ती ही सतत बेरोजगारी आणि स्थिर आर्थिक स्थितीसह, पुनर्प्राप्तीच्या दिशेने संथ गतीने तिची तिच्या वैशिष्ट्यासह संथ वाटचाल करीत आहे. ही वाटचाल मंद गतीकृत असून ती स्थिर आहे असाच याचा अर्थ निघताना दिसून येतो. अर्थव्यवस्थेतील होणारा आर्थिक विकास व आर्थिक वृध्दी ही स्थैर्य राखत आहे. शेवटी इंग्रजी K - आकाराची पुनर्प्राप्ती ही अशी परिस्थिती दर्शवित असते की, जिथे समाजाच्या विविध स्तरांमध्ये तीव्र भिन्नता आहे. त्यांच्यात दोन वर्गात आर्थिक विषमता निर्माण होत असून ही विषमता समाजात दोन समांतर वर्ग निर्माण करीत आहे किंवा फुट पडत आहे असाच याचा अर्थ निघतो. आताच्या या चालू आर्थिक वर्ष 2021 – 2022 येत असताना, आर्थिक पुनर्प्राप्ती कोणता आकार घेत आहे हे आपण पाहत असलेल्या संदर्भावर अवलंबून असते. यासंदर्भात वित्त मंत्रालयाचे अधिक्रुत मत असे आहे की, सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची होणारी पुनर्प्राप्ती ही V-आकाराची आहे, परंतु बहुतेक अर्थशास्त्रज्ञांना असे वाटत नाही. मागील काही वर्ष-दर-वर्षाच्या आर्थिक वाढीवर नजर टाकल्यास, पहिल्या तिमाहीनंतर 20 टक्के आर्थिक विस्तारामुळे पुनर्प्राप्ती V - आकाराची झालेली आहे असे दिसून येते. तथापि मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी 24 टक्क्यांच्या पेक्षा कमी आकुंचनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला हा वरचा धक्का बसलेला आहे. देशात आलेल्या दुसऱ्या कोविड लाटेमुळे झालेला प्रचंड व्यत्यय या आर्थिक वाढीने पकडलेला नाही. याचे कारण एप्रिल-जून FY2022 या कालावधीत GDP 2019-20 च्या पहिल्या Q1, कोविडपूर्व कालावधीपेक्षा अजूनही 9.2 टक्के कमी होता. याशिवाय मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत ते अनुक्रमे 16.9 टक्के कमी होते. जर एखाद्याने तिमाही-दर-तिमाही आर्थिक वाढ पाहिली तर, येत्या तिमाहीत वाढ दिसल्यास पुनर्प्राप्ती W-आकार असेल असे दिसते. तथापि तिमाही-दर-तिमाही पाहिल्यावर, GDP सामान्यतः Q1 मध्ये संकुचित होतो, याचे कारण Q4 मध्ये अर्थव्यवस्थेचा आकार जास्त असतो. जेव्हा आर्थिक वाढीला हंगामानुसार समायोजित केलेल्या तिमाही-दर-तिमाहीच्या संदर्भात पाहिले जाते, तेव्हा ते पुढील तिमाहीत आल्यास ते W-आकाराचे असल्याचे दिसते. सध्याच्या काळात हा सर्वात योग्य उपाय आहे. बिझनेस स्टँडर्डने नेहमीच अद्ययावत माहिती प्रदान करण्यासाठी आणि आपल्यासाठी स्वारस्य असलेल्या आणि देश व सर्व जगासाठी व्यापक राजकीय आणि आर्थिक परिणाम असलेल्या घडामोडींवर भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात आजची आर्थिक स्थिती कशी सुधारावी यासाठी सर्वांचे प्रोत्साहन आणि सततच्या महतप्रयासाने या आदर्शांसाठी आपला संकल्प आणि वचनबद्धता अधिक मजबूत केली जात असते. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या या कठीण काळातही भारतीय अर्थव्यवस्था आपले चांगले प्रयत्न करीत आहे ही आशादायक बाब आहे.
( लेखक जीवन विकास महाविद्यालय देवग्राम येथे उपप्राचार्य असून रा.तू.म. नागपूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत.)