संभ्रम विरुद्ध वास्तव : भारत–अमेरिका व्यापार कराराचा ऐतिहासिक विजय
संभ्रम विरुद्ध वास्तव : भारत–अमेरिका व्यापार कराराचा ऐतिहासिक विजय डॉ. राजू घनश्याम श्रीरामे भ्रमणध्वनी - 7620881729 बॉक्स आजचा भारत हा असा आहे, जो डोळ्यात डोळे घालून वाटाघाटी करतो आणि आपल्या अटींवर करार करून घेतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अमेरिकेसारख्या महासत्तेलाही ५० टक्क्यांहून अधिक असलेले दंडात्मक टॅरिफ मागे घेऊन ते थेट १८ टक्क्यांपर्यंत आणायला भाग पाडले. लेख आजच्या जागतिक राजकारणात व्यापार हा केवळ आर्थिक व्यवहार नसून तो राष्ट्राच्या स्वाभिमानाशी, सुरक्षिततेशी आणि भविष्यातील विकासाशी थेट जोडलेला असतो. अशा वेळी भारत–अमेरिका व्यापार कराराकडे पाहताना विरोधकांनी पसरवलेला संभ्रम आणि प्रत्यक्ष वास्तव यामध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे. जेव्हा काही जण या कराराला “शरणागती” म्हणत आहेत, तेव्हा वास्तवात हा करार म्हणजे झुकलेल्या महासत्तेवर अटी लादणाऱ्या आणि न झुकणाऱ्या भारताचा ऐतिहासिक विजय आहे. एकेकाळी अमेरिकेने दंडात्मक करांची भीती दाखवून अनेक देशांना झुकवले आहे. पण आजचा भारत तो नाही, जो मदतीसाठी हात पसरायचा. आजचा भारत हा असा आहे, जो डोळ्यात डोळे घालून वाटाघाटी करतो आण...